नवजीवन आधार संस्था ही ठाणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असलेली नोंदणीकृत सामाजिक संस्था असून, समाजातील गरीब, निराधार व गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरतपणे कार्य करत आहे.
नवजीवन आधार संस्था ही ठाणे, महाराष्ट्र येथे कार्यरत असलेली नोंदणीकृत (रजिस्टर्ड) सामाजिक संस्था आहे. समाजातील गरीब, निराधार व गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था अविरतपणे कार्य करत आहे.
ज्या गरीब व गरजू पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही, तसेच राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करता येत नाही, अशा पालकांची मुले उदरनिर्वाहासाठी काम-धंद्यासाठी बाहेर जाण्यास भाग पडतात. अशा मुलांना आमच्या आश्रम/हॉस्टेलमध्ये शिक्षण, जेवण, राहणे व आरोग्य या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करून प्रवेश दिला जातो.
ज्या गरीब व गरजू पालकांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही, तसेच राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करता येत नाही, अशा पालकांची मुले उदरनिर्वाहासाठी काम-धंद्यासाठी बाहेर जाण्यास भाग पडतात. अशा मुलांना आमच्या आश्रम/हॉस्टेलमध्ये शिक्षण, जेवण, राहणे व आरोग्य या सर्व मूलभूत गरजांची पूर्तता करून प्रवेश दिला जातो.
प्रत्येक निराधार मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याचे बालपण सुरक्षित रहावे आणि तो समाजाचा जबाबदार व सक्षम नागरिक बनावा, हीच आमची दृष्टी आहे.
संस्थेचे कार्य श्री. एस. पी. तायडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अनेक वर्षांपासून निराधार मुलांच्या सेवेत कार्यरत आहे.
"प्रत्येक मुलाला शिक्षणाचा व सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— एस. पी. तायडे सर, संचालकआमच्या उपक्रमांची सविस्तर माहिती पहा किंवा थेट संपर्क साधा.